Friday, 25 April 2014

१०.रणगाडा संग्रहालय / Tank Museum Ahmednagar

१०.रणगाडा संग्रहालय:- 

अहमदनगर- सोलापूर रस्त्यावर फरह बक्ष महालाजवळ असलेले आर्मर्ड कोअर सेंटर & स्कूल ने १९९४ मध्ये उभारलेले हे संग्रहालय म्हणजे अहमदनगर शहराचेच नव्हे तर संपूर्ण देशाचेच भूषण आहे..आशिया खंडातील या एकमेव संग्रहालयात इंग्लंड,अमेरिका, रशिया, जर्मनी, जपान, फ्रांस आदी देशांची ४० पेक्षा जास्त विविध रणगाडे ठेवण्यात आले आहेत.जमिनीत पुरलेले सुरुंग नष्ट करणारे, रस्त्यातले अडथळे दूर करून सैन्याचा मार्ग मोकळा करणरे, पाण्यात तरंगणारे, असे विविध प्रकारचे रणगाडे येथे आहेत.

 

 जालियनवाला बाग हत्याकांडात जनरल डायर ने वापरलेले सिल्वर घोस्ट जातीचे चिलखती वाहन येथे ठेवण्यात आले आहे. खऱ्याखुऱ्या रणगाड्या बरोबर त्यांच्या प्रतिकृती आणि छायाचित्रे व लष्करी ध्वज आदींचे येथे प्रदर्शन एके. पाक युद्धात भारतीय सैन्याने नामोहरम केलेल्या रणगाडा येथे आहे. त्याच बरोबर बंगला युध्यत भारतीय सैन्याने जप्त केलेला पाकिस्थान चा ध्वजही येथे पहावयास मिळतो.बस स्थानकापासून अंतर ५ किमी. आहे.


९.स्नेहालय / Snehalaya

९. स्नेहालय :- 

उपेक्षितांचा आधारवड म्हणून स्नेहालय ओळखले जाते. सामाजिक परिवर्तन आणि अंत्योदयचा स्नेहालय हा एक अभिनव प्रयोग आहे. पोटासाठी शरीरविक्रय करणाऱ्या महिला, वेश्या, देवदासी, अनि त्यांच्या निराधार उपेक्षित संततीच्या सर्वांगीण पुनर्वसनाचे काम ही संस्था सन १९८९ पासून पाहते. नगर-मनमाड रस्त्यावरील नागपूर ओद्योगिक वसाहतीत स्नेहालय चा पुनर्वसन प्रकल्प आहे. तेथे वेश्यांच्या मुलं-मुलींसाठी वसतीगृह उभारण्यात आले आहे, प्रकल्पाची इमारत घुमटाकृती आहे. एड्स चा वाढता प्रसार लक्षात घेऊन अशा एड्सग्रस्त साठी आधार वसाहत व उपचार केंद्र स्थापन केले आहे.

 

 स्नेहालय तर्फे नगरच्या वेश्यावस्तीत संस्कार केंद्र चालवले जाते. अनौपचारिक व्यावसायिक शिक्षण, रात्रघर, आरोग्य प्रकल्प फसवल्या गेलेल्या महिलांसाठी स्नेहाधार, अडचणीतल्या मुलं-मुलींसाठी चाईल्ड लाईन असे संस्थेचे विविध उपक्रम आहेत. वेश्याव्यवसायात नव्याने मुली येऊ नयेत म्हणून स्नेहालय ने मोठी मोहीम हाती घेतलेली आहे. बस स्थानकापासून अंतर १२ किमी आहे.


८.चांदबीबी महाल / Chandbibi Mahal

८.चांदबीबी महाल :- 

अहमदनगर शहरात प्रवेश करतांना दूर डोंगरावर उभी असलेली ही वास्तू नजरेत भरू लागते. नगर-पाथर्डी रस्त्यावरील ही वास्तू खर तर मुर्तझा निजामशहा चा मंत्री सरदार सालाबत खान (दुसरा) याची कबर आहे. समुद्र सपाटीपासून ३०८० फुट उंचीवर, शहा डोंगराच्या पठारावर ही तीन माजली अष्टकोनी दगडी वास्तू बांधण्यात आली आहे. सालाबत खान सन१५८९ मध्ये वारला. पण त्याने आपल्या हयातीतच सन १५८० मध्ये ही कबर बांधून ठेवली.या इमारतीच्या तळघरात सालाबत खान आणि त्याच्या पत्नीची कबर आहे. तर वास्तूच्या आवरत दुसऱ्या पत्नीची आणि कुत्र्याची कबर आहे.

 

 महालाभोवती डोंगर उतरणीवर तीन तलाव बांधण्यात आले आहेत. पायथ्याशी वीरभद्र मंदिर आहे. जवळच विवेकानंद सागर तलाव आहे. महालाभोवती खिरनीची जुनी झाडी आहेत. निजामशाहीच्या काळात ही वास्तू लष्करीदृष्ट्या अत्यंत महत्वाची मानली जात असे. दुर्बिण महाल म्हणूनही या वास्तूचा उल्लेख केला जातो. ब्रिटिशांनी याचा उपयोग सैनिकांसाठी आरोग्य धाम म्हणूनही उपयोग केला. बस स्थानकापासून अंतर १२ किमी आहे.


७.तळ्यातला महाल ( फैजबक्ष महाल ) / Talyatala Mahal ( Faijbaksh Mahal )

७.तळ्यातला महाल ( फैजबक्ष महाल ):-

हश्त - बेहश्त बागेतील एका छोट्या तालावाच्यामाध्याभागी असलेली फैजबक्ष महालही अष्टकोनी दुमजली वस्तू सन १५०६ मध्ये अहमद निजामशाह च्या काळात बांधण्यात आली.या वास्तूचे आठ दरवाजे म्हणजे स्वर्गाचे आठ द्वारअसे म्हणाले जाते. पूर्वी या महालामध्ये जाण्यासाठी होडीचा वापर कराव लागत असे.या वस्तूच्या दक्षिणेकडे हमामखाना आहे. हमामखाना म्हणजे सार्वजनिक स्वच्छतागृह . परंतु हे फक्त बादशाह च्या परिवारातील लोकांसाठीच वापरले जात. पिंपळगाव व शेंदीच्या तलावातून येथे खापरी नळाने पाणी आणण्यात आले होते. येथील खेळती हवा व प्रकाश व्यवस्था पाहण्याजोगी आहे. पूर्वी येथे गुलाबाचे सुंदर उद्यान होते. अकबर पुत्र मुरड नगरवर स्वारी करण्यासाठी आला तेव्हा येथे मुक्कामाला होता. महालाजवळ लक्कड महाल ही वस्तू आहे. मुर्तझा दिवाना येथे अज्ञातवासात राहत होता. काही अंतरावर हवा महाल आहे.याचे वैशिष्ट्य म्हणजे हवा कुठल्याही बाजूने आली तरी मनोऱ्यावर असलेल्या झरोक्यातून प्रवाह आत येतो.

६.बागरोजा / Bagroja

६.बागरोजा :-

अहमदनगर शहराची स्थापना करणारा अहमद निजामशहा सीना नदीकाठी उभ्या असलेल्या या वस्तुत चिरशांती घेत आहे. या घुमटाकृती इमारतीभोवती दहा फुट उंचीचा कोट आहे. पूर्वी या परिसरात उद्यान होते, आता तेथे शेती केली जाते. बादशाह आणि त्याच्या पत्नीची कबर असलेल्या या वस्तूच्या घुमटाच्या आत, तसेच बाहेरच्या भिंतीवर सुंदर नक्षीकाम असून त्यावर कुराणातील वाचणे कोरण्यात आली आहे.बाहेरच्या बाजूस चौरसात व वर्तुळात वेगवेगळया प्रकारच्या भौमितिक रचना कोरण्यात आलेल्या आहेत.

घुमटाच्या मध्यभागी एक झरोका असून दिवसा सूर्याची व रात्री चांदण्यांची किरणे बरोबर बादशाह च्या कबरीवर पडतात.त्यावेळच्या रीतीरिवाजाप्रमाणे मुल कबरी तळघरात असाव्यात पण तेथे जायला रस्ताच नाही बगरोजाच्या आवारात बुऱ्हाण निजामशाह च्या पदरी असलेल्या व ज्याने निजामशाही ला शिया पंथीय बनवले तो शहा ताहीर व राज घराण्यातील इतर अनेक महत्वाच्या व्यक्तींच्या कबरी आहेत. मात्र अहमद निजामशहा वगळता इतर महत्वाच्या व्यक्तींची शव नंतर इराकमधील करबला येथे दफन करण्यात आली. या वस्तूकडे जाण्यासाठी साताळकर रुग्णालयाच्या बाजूने पायवाट आहे.


५.श्री विशाल गणपती / Shri Vishal Ganpati

५.श्री विशाल गणपती:-

अहमदनगर शहराचे श्री विशाल गणपती हे ग्राम दैवत आहे. शहरातील माळीवाडा भगत असलेली ही गणपती ची मूर्ती नावाप्रमाणेच विशाल महणजे ११ फुट आहे. या पूर्वाभिमुख उजव्या सोंडेच्या गणपतीची बैठक नेहमीपेक्षा वेगळीं असून मूर्ती विशिष्ट मिश्रणापासून तयार करण्यात आलेली आहे.

 

मूर्तीच्या बेंबीवर फणाधारी नाग आहे, तर डोक्यावर पेशवेकालीन पगडी आहे. गणेशोत्सवातील मिरवणुकीत पहिला मान या गणपती ला आहे.


४.बुऱ्हानगरची देवी / Burhanagar Goddess Temple

४.बुऱ्हानगरची देवी:-

कापूरवाडी तलावाकडे जात असतांना डाव्या बाजूला बुऱ्हानगर च्या देवीचे मंदिर दिसते. तुळजापूरच्या देवीचे हे जाज्वल्य ठाणे मानले जाते. सातवाहन काळातील राजा संभूराययाला आपल्या राजधानीचा त्याग करावा लागला त्यानंतर तो अंबाबाईची मूर्ती व सिंहासन घेऊन जंगलात येऊन राहिला.सातवाहन घराण्यातील अखेरचा राजा भीम याचा सेनानी चाहु याने तेलप चालुक्याच्या मदतीने संभू रायाचा प्रभाव करून देवीची मूर्ती आपल्याबरोबर नेली अशी कथा सांगितली जाते.

 

नवरात्रोत्सवाच्या काळात तिसऱ्या मालेस येथे मोठी यात्रा भरते.देवीचा पलंग तुळजापूरला वाजत गाजत नेला जातो.ही परंपरा संत जनकोजी यांच्यापासून चालू आहे. देवीचे हे मंदिर सन १९१३ मध्ये लहानू भिकाजी भगत यांनी बांधले. अलीकडेच त्याचा जीर्णोद्धार झाला. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर तेलाचा घन आहे. समोर सिंहाच्या मूर्तीचे दर्शन घेऊन भाविक आत जातात.जगदंबा मातेचीमुर्ती काळ्या शिळेची आहे. मिरवली पहाडावर जाणारा रस्ता बुऱ्हानगर वरूनच जातो. याचे बस स्थानकापासून चे अंतर ४.५ किमी आहे.